Category: देश-विदेश
-

अभिमानास्पद,भारत विश्व चॅम्पियन!
पुणे -महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत विश्व चषकावर आपले नाव कोरले.भारतीय महिलांनी दाखवलेल्या जिगरबाज खेळीमुळे देशाची मान उंचावली आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होत असलेला फायनल सामना पावसामुळे २ तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ बाद २९८ धावा…
-

राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती!
नवी दिल्ली -देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा मोठा पराभव केला. एकूण मतदान 768 झाले होते, परंतू १५ मते अवैध ठरली आहेत. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली आहेत. तर बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. एनडीएची मते वाढल्याने इंडिया आघाडीला…
-

जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम होणार खासदार!
मुंबई -अजमल कसाब सह अनेक आरोपीना फाशी मिळावी यासाठी सरकारच्या वतीने भक्कम बाजू मांडणारे जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्यासह चार जणांचे राष्ट्रपतीनी राज्यसभेसाठी नामांकन केले आहे. त्यामुळे निकम आता खासदार होणार हे नक्की झाले आहे. निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि…
-

तीन हजारात फास्टॅग!वर्षभर कुठंही फिरा!
नवी दिल्ली -एका ऐतिहासिक उपक्रमाअंतर्गत, १५ ऑगस्ट २०२५ पासून ₹३,००० किमतीचा FASTag आधारित वार्षिक पास सुरु केला जात आहे. हा पास सक्रीय होण्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, जे आधी पूर्ण होईल तेवढ्यापर्यंत वैध असेल. हा पास फक्त बिगर-व्यावसायिक खासगी वाहने (कार, जीप, व्हॅन इत्यादी) यांच्यासाठीच खास तयार करण्यात आला आहे आणि तो संपूर्ण…
-

गुजरात मध्ये विमान अपघात!242 प्रवाशांना घेऊन केले होते उड्डाण!
नवी दिल्ली -देशाला हदरवून सोडणारी एक धक्कादायक घटना गुजरात मधील अहमदाबाद येथे घडली आहे. तब्बल 230प्रवासी आणि 12 क्रू मेंबर ला घेऊन निघालेले एयर इंडिया चे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात मृत आणि जखमीचा आकडा अद्याप समोर आलेला…
-

मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र खंडपीठ!
नवी दिल्ली -मराठा आरक्षणाच्या विषयावर दाखल याचिकांना लवकर निकाली काढण्यासाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी दिले. सरन्यायाधीश बी. आर .गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या…
-

पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही -मोदींचा पाकला सज्जड दम!
नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तान वर केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेली युद्धबंदी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यापुढे पाकिस्तानच्या अन्वस्त्र धमकीला घाबरणार नाही तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकतं नाही असा ईशारा मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी…
-

भारताच्या हल्यात पाकचे मोठे नुकसान!
नवी दिल्ली -भारत पाकिस्तान दरम्यान 7 ते 11 में दरम्यान जे युद्ध झाले त्यात पाकिस्तान चे अतोनात नुकसान झाले असल्याचे पुरावे भारताने दिले आहेत. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ७ मे रोजी दहशतवाद्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानी सैन्याने तो स्वतःचा लढा बनवला. म्हणूनच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागला, असं एअर मार्शल…
-

युद्धबंदीची घोषणा!यापुढे अतिरेकी कारवाई झाल्यास युद्ध समजलं जाणार!
नवी दिल्ली -पहलगाम अतिरेकी हल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु झालेले युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी hi माहिती एक्स वरून दिली. त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली. यापुढे भारतात कोणत्याही प्रकारे अतिरेकी कारवाई झाल्यास ते युद्ध समजले जाईल असेही भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५…
-

भारताचा पाकिस्तानवर हल्ला!पन्नास ठिकाणी ड्रोन अटॅक!
नवी दिल्ली -ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर आक्रमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान ला भारताने चांगलीच अद्दल घडवली आहे. तब्बल पन्नास ठिकाणी ड्रोन ने हल्ला करून भारताने पाकची रडार यंत्रणा उध्वस्त केली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच…


