News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • महाप्रबोधन यात्रेपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले !जिल्हाप्रमुख जाधव यांची गाडी फोडली !!

    बीड- खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना बीडमध्ये घडली.उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाली.वरेकर यांनी यावेळी जाधव यांची गाडी फोडली.हा सगळा प्रकार घडला त्यावेळी उपनेत्या अंधारे या देखील समोर होत्या हे विशेष. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये 20 मे रोजी होणार…

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…

  • महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये शनिवारी समारोप -अनिल जगताप !

    बीड- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये येत्या 20 मे रोजी होत आहे.या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख धोंडू पाटील,माजीमंत्री बदामराव पंडित,माजी आ सुनील धांडे,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची…

  • मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

    नवी दिल्ली- देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील खात्याचा कारभार अचानकपणे काढून घेण्यात आला आहे.आता अर्जुन मेघवाल नवे कायदामंत्री असतील.गेल्या काही महिन्यांपासून न्यायाधीश आणि रिजिजू यांच्यातील वादामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  मोदी सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे….

  • साडेतीन हजार अतिक्रमण धारकांना नोटिसा !

    आष्टी- सरकारी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने तालुक्यातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महिनाभरात अतिक्रमण नियमित करून घ्या अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढून घेईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्यातील अनेक भागातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दरम्यान अशाच काही नोटीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील…

  • साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर !

    मुंबई- साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र यावर्षी एक नंबर वर राहिलेला आहे.महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपून जवळपास वीस दिवस उलटून गेले आहेत.देशात सर्वाधिक साखर उतारा गुजरात मध्ये मिळाला आहे.अद्यापही उत्तर प्रदेश मधील कारखाने सुरू आहेत हे विशेष. साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. या खालोखाल हरियाना, पंजाब आणि…

  • फुकटच्या आश्वासनावर खर्च होणार 62 हजार कोटी !

    कर्नाटक- भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटक मध्ये सत्ता ताब्यात घेतली.या विजयाचे श्रेय नेत्यांच्या मेहनतीला जसे आहे तसेच फुकटच्या आश्वासनाला देखील आहे.कारण काँग्रेसने फुकट वीज,महिलांना 2 हजार भत्ता आणि बेरोजगार युवकांना 3 हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.हे सगळं पूर्ण करायचं म्हटल्यास वर्षाकाठी 62 हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीवर ताण पडणार आहे. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान…

  • कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !

    नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व…

  • जिल्ह्यात पंधरा दिवस जमावबंदी !

    बीड- पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.या काळात मोर्चे,निदर्शने, आंदोलन,सभा,समारंभ ,रस्ता रोको आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे.अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली. बीड जिल्हयात दि. 14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराज जंयती साजरी होणार आहे असून जिल्ह्यात राजकिय हलचाली व घडामोडी मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे, रास्ता…

  • आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो….