News & View

ताज्या घडामोडी

साडेतीन हजार अतिक्रमण धारकांना नोटिसा !

आष्टी- सरकारी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने तालुक्यातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महिनाभरात अतिक्रमण नियमित करून घ्या अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढून घेईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

राज्यातील अनेक भागातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दरम्यान अशाच काही नोटीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार नागरिकांना पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आष्टी तालुक्यातील सरकारी मालकीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, अतिक्रमणधारक यात अपयशी ठरल्यास त्यांनी अतिक्रमण पुढील 60 दिवसांत स्वत: काढावे, अन्यथा हे निष्कासित करण्यात येणार आहे. आष्टी तालुक्यातील जवळपास साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना महसूल विभागाने नोटीस धाडल्या आहेत.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गायरान जमीन क्षेत्र असल्याने अनेकांनी त्यावर अतिक्रमण करुन पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर मालकी हक्क दाखवला आहे. तसेच काही लोकांनी लोकांनी शासकीय गायरान जमिनीवर कोणतेही परवानगी न घेता बांधकाम देखील केले आहेत. त्यामुळे राज्यातील गायरान जमिनीवरील केलेली अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत वर्षअखेर निष्कसित करण्याचे आदेश असल्याने स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे.

तर केलेले अतिक्रमण 60 दिवसांच्या आत काढून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे. शासकीय जागेवरील केलेले अतिक्रमण दूर करुन त्यांचा ताबा मंडळ अधिकाऱ्याकडे न दिल्यास कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आपले अतिक्रमण अथवा बांधकाम शासकीय खर्चाने निष्कासित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार महसूलची थकबाकी म्हणून अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *