News & View

ताज्या घडामोडी

Category: आष्टी

  • मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!

    आष्टी- गाव चलो अभियानात चोभा निमगाव गावात पोहचलेल्या भाजपचे माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला. मराठा आरक्षणाच्या विषयावरून सध्या सर्वत्र वातावरण तापले असून त्याचा फटका राजकीय मंडळींना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत…

  • 2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…

  • जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !

    बीड- जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.धानोरा मंडळात तब्बल 132 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे,शेतीचे नुकसान झाले. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळ (68.8 mm), कडा मंडळ (93.5 mm), दौलावडगाव मंडळ (89.8 mm), पिंपळा (72.3 mm) व धानोरा मंडळ (132.5 mm) तसेच अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई…

  • प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !

    बीड- प्रेमविवाह होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीड  जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ढोबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे…

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….

  • सरसकट विद्यार्थ्यांना मोफत गणवेश नाहीच !

    बीड- समग्र शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.मात्र निधी वाटप करताना 300 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे निधी दिला आहे.त्यातही सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाहीये.बीपीएल वरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार नसल्याने पालकात नाराजी आहे.बीड जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 993 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी वितरीत…

  • घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…

  • बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण…

  • दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

    बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…

  • आष्टीमध्ये बालविवाह ! विजय गोल्हार यांच्याविरुद्ध गुन्हा !!

    आष्टी- एकीकडे राज्य सरकार,पोलीस हे सगळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करत असताना भाजपच्या माजी जी प अध्यक्षांच्या पतीने बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसात तब्बल तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी तालुक्यातील वेताळवाडीमध्ये हा बालविवाह लावण्यात आला. याप्रकरणी आता भाजप नेता विजय गोल्हार यांच्यासह नवरी व नवरदेवाचे आई- वडिल, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह…