News & View

ताज्या घडामोडी

Tag: #धनंजय मुंडे

  • आधार लिंक नसल्याने 32 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

    बीड- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आधार लिंक नसणे व इतर गोष्टींमुळे राज्यभरातील तब्बल 32 लाख शेतकरी यावेळच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्याच हप्त्याला मुकणार असल्याची सद्य:स्थिती आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

     नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…

  • महाप्रबोधन यात्रेपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले !जिल्हाप्रमुख जाधव यांची गाडी फोडली !!

    बीड- खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना बीडमध्ये घडली.उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाली.वरेकर यांनी यावेळी जाधव यांची गाडी फोडली.हा सगळा प्रकार घडला त्यावेळी उपनेत्या अंधारे या देखील समोर होत्या हे विशेष. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये 20 मे रोजी होणार…

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…

  • महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये शनिवारी समारोप -अनिल जगताप !

    बीड- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये येत्या 20 मे रोजी होत आहे.या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख धोंडू पाटील,माजीमंत्री बदामराव पंडित,माजी आ सुनील धांडे,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची…

  • मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

    नवी दिल्ली- देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील खात्याचा कारभार अचानकपणे काढून घेण्यात आला आहे.आता अर्जुन मेघवाल नवे कायदामंत्री असतील.गेल्या काही महिन्यांपासून न्यायाधीश आणि रिजिजू यांच्यातील वादामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  मोदी सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे….

  • साडेतीन हजार अतिक्रमण धारकांना नोटिसा !

    आष्टी- सरकारी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने तालुक्यातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महिनाभरात अतिक्रमण नियमित करून घ्या अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढून घेईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्यातील अनेक भागातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दरम्यान अशाच काही नोटीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील…

  • कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !

    नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व…

  • आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो….