Category: महाराष्ट्र
-

दिड लाख विद्यार्थ्यांना मिळणार आयटीआय मध्ये प्रवेश !
बीड- दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआय मध्ये प्रवेश घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.राज्यभरात यावर्षी आयटीआय मध्ये वेगवेगळ्या ट्रेड च्या दीड लाख जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या आयटीआय मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन…
-

मान्सून लांबल्यास पाणी संकट ओढवणार !
बीड- राज्यात यंदा मान्सून चे आगमन उशिरा होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.एकीकडे अंगाची लाही लाही करणारे प्रचंड ऊन अन दुसरीकडे लांबणारा पाऊसकाळ यामुळे जनता बेजार झाली आहे.अशात जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यातील धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 जुननंतर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील एकूण दोन हजार…
-

ऑगस्ट मध्ये होणार तलाठी भरती !
बीड- महसूल विभागात येत्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मेगा भरती होणार आहे.चार हजार पेकशा जास्त तलाठी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. राज्यात 4625 जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे. भरतीची जाहिरात आल्यामुळे या भरतीची वाट…
-

पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!
परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप…
-

पदोन्नती होऊनही आनेराव ग्रामीण पाणी पुरवठा सोडायला तयार नाही ! माल मिळत असल्याने सीईओ मूग गिळून गप्प !!
बीड- पदोन्नती झाल्यानंतर कोणताही अधिकारी, कर्मचारी खुश होऊन त्या पदावर तातडीने रुजू होतो,मात्र बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वडवणीला नियुक्ती असताना बीड कार्यालयात कारभार पाहणारे व्ही डी आनेराव या कर्मचाऱ्याला खुर्चीचा मोह सुटत नाहीये.शिक्षण विभागात पदोन्नती झाल्यानंतर देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर स्वतःची ऑर्डर याने काढून घेतली आहे.कारण ग्रामीण पाणी पुरवठा विभागात…
-

राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !
बीड- राज्यातील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असेल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर शालेय समिती कामाला लागली आहे.शाळा सुरू व्हायला अवघे आठ दहा दिवस शिल्लक असताना ड्रेस नेमका कोणत्या रंगाचा घ्यायचा याबाबत संभ्रम कायम आहे.त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेष मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24…
-

कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !
बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला . बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर…
-

आता अहमदनगर नव्हे अहिल्यानगर !
चौंडी- औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतराचा विषय अद्याप न्यायालयात प्रलंबित असताना सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची घोषणा केली.चौंडी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारोंच्या साक्षीने ही घोषणा केली. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री…
-

शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत करा – जोशी !
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केल्यानंतर आता भाजपचे माजी आ श्रीकांत जोशी हे देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बळीराजाला साथ देण्यासाठी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जोशी यांनी केली आहे. मागील काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेती व्यवसाय हा नुकसानीत येत असून…
-

वीज जोडणी रखडल्याने शेतकरी हैराण !
बीड- यावर्षी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. मान्सून दारात असताना शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे.मराठवाडा आणि विदर्भात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी वीज जोडणी साठी अर्ज देऊन अनेक महिने उलटले तरीही महावितरण कडून जोडणीची कारवाई न झाल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात वीज खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी, ५२ लाख, ८५…



