Category: महत्त्वाच्या
-
मंत्री बँकेने नाट्यगृह केले सील !कर्जाचा छदाम ही न भरल्याने कारवाई !!
बीड– तब्बल दहा वर्षांपासून बांधकामासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याने अखेर बीडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई द्वारकादास मंत्री बँकेने केली.नगर पालिकेने या नाट्यगृहाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न मिळवले मात्र बँकेला दमडी न भरल्याने अखेर या कारवाईला सामोरे जावे लागले. येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने बीड नगर परिषदेच्या नाट्यगृहाचे बांधकामाकरिता कर्ज दिले…
-
वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !
बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…
-
शेतकऱ्यांना आता जागेवर काटा पेमेंट ! बीड बाजार समितीमध्ये आ क्षीरसागर यांचा निर्णय !!
बीड -बाजार समितीची सत्ता हातात आल्यानंतर आ संदिप क्षीरसागर यांनी प्रथमच बीट च्या वेळी हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पुढे बीड बाजार समितीमध्ये दिवसातून दोनवेळा बीट होईल आणि शेतकऱ्यांना काटा पेमेंट मिळेल अशी माहिती आ क्षीरसागर यांनी दिली. शेतकरी परिवर्तन आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तनाची सुरुवात केली असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या…
-
रेशनवर मिळणार ज्वारी अन बाजरी !
बीड- राज्यातील सात कोटी जनतेला गहू आणि तांदळासोबत आता ज्वारी आणि बाजरी देखील रेशन मार्फत वितरित केली जाणार आहे.तृणधान्याचे आहारात जास्तीतजास्त समायोजन व्हावे याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील सात कोटी दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिले जातात. याऐवजी किंवा याबरोबरच ज्वारी आणि बाजरी शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे. काही…
-
सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!
नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे. ब्रिटिशांच्या…
-
खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील…
-
वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!
बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…
-
दिव्यांग शिक्षकांची जे जे मध्ये होणार तपासणी !
बीड- जिल्हा परिषदेच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या तब्बल 41 शिक्षकांना 31मे पर्यंत मुंबईच्या जे जे रुग्णालयात हजर राहून तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.शिक्षकांनी हा अहवाल वेळेत न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलाच्या वेळी तब्बल 300 पेक्षा जास्त शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र…
-
जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!
बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…
-
शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे…