धारूर – सासुरवाडी वरून रिक्षाने परत येत असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.बीड नजीक रिक्षाला कंटेनर ने जोराची धडक दिली.यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अजीम शेख राहणार इस्लामपुरा राजू चौक आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटेगाव तालुका धारूर येथे आपल्या सासरवाडीला गेले होते परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनर आपला ताबा सोडला यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली यामध्ये नसरीन अजीम शेख वय 35, नोमान अजीम शेख वय 13, अदनान अजीम शेख वय 12 हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाल्याची घटना घडली
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून यांना उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पुढील तपास करत आहे.
Leave a Reply