News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!

    नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील…

  • नगर पालिकेला टाळे ! पगारासाठी कामगार आक्रमक !!

    बीड- बीड नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी थकीत पगारासाठी टाळे ठोकले .गेल्या अनेक महिन्यापासून नगर परिषदेच्या स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराने कामगारांना वेतन दिलेले नाही,त्यामुळे संतप्त कामगारांनी नगर परिषदेच्या मेन गेट ला कुलूप ठोकले.त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीड शहरातील स्वच्छता करण्याचे कंत्राट नांदेड येथील कंत्रादाराला देण्यात आलेली आहे.मात्र शहरातील परिस्थिती पाहता स्वछता केवळ…

  • अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !

    बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…

  • अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !

    बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…

  • बारावीत पुन्हा पोरीचं हुशार !

    बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे.राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे,सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला…

  • डॉ हजारी यांच्या मुलाचे अपहरण ! चार तासात आरोपी जेरबंद !!

    बीड- बीड शहरातील एसपी ऑफिससमोर राहणाऱ्या डॉ विशाल हजारी यांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.जुन्या ओळखीतून जय विशाल हजारी याचे अपहरण करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मनीष प्रकाश क्षीरसागर आणि शैलेश संतोष गिरी या दोघांनी मंगळवारी सायंकाळी जय विशाल हजारी याला घराबाहेर बोलावून घेतले.तेथून गाडीवर…

  • आता टीसी मुळे प्रवेश अडणार नाही !

    बीड- एखाद्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी नसेल तर त्याला नव्या शाळेत प्रवेशास अडचणी येत असत,मात्र राज्य शासनाने ही अडचण दूर केली आहे.आता टीसी नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाहीये,असे झाल्यास संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होईल असा इशारा दिला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरात ४८ लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या…

  • वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!

    बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…

  • ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…

  • कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    बीड- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आता कांदाचाळ चा देखील समावेश करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणीच्या कामासाठी लागणारा किमान एक लाख 60 हजाराचा खर्च मनरेगा मधून दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रोहयो विभागाने केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड…