Tag: #एसपी बीड
-
देवभाऊ तुमचं चुकलंच !
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर देवा भाऊ तुमचं खरंच चुकलं, तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा म्हणजेच 70 च्या दशकात शरद पवारांनी राजकारणातलं पहिलं बंड केलं आणि पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार ऑक्सफर्ड डिक्शनरीत लिहिला गेला. आता पवारांचं बंड आणि त्यांनी वेळोवेळी स्वपक्षीयांना ब्लॅकमेल करत आपलं मांडलेलं दुकान आणि आपल्याच पक्षासोबत वेळोवेळी केलेला धोका सर्वसामान्य वाडी…
-
सेवानिवृत्त शिक्षकाला पुन्हा सेवेत घेणे अंगलट आले !शिक्षण विभागातील दोघांवर कारवाई !!
बीड- पक्षाघातामुळे आजारी असलेल्या अन मेडिकल बोर्डाने अनफिट केलेल्या शिक्षकाला परत सेवेत घेण्याचा कुटाना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.कनिष्ठ लिपिक गोसावी यांना निलंबित तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत.यामध्ये शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी देखील डोळेझाक केल्याने सीईओ पवार…
-
जाटनांदूर जवळ अपघात ! चार जण जागीच ठार !
डोंगरकिन्ही– बीड कल्याण महामार्गावर डोंगर किनी नजीक असलेल्या जात नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे जात नांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगर कडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराई कडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला हा अपघात…
-
ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !
नवी दिल्ली- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर पासून भारतात सुरू होत आहे.मुंबई,पुण्यासह भारताच्या वेगवेगळ्या शहरात क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सोबत असणार आहे.फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ…
-
सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !
बीड- छत्रपती संभाजी नगर चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.केंद्रेकर यांनी शासनाकडे स्वेच्छा निवृत्ती चा केलेला अर्ज शासनाने मंजूर केला आहे.शासकीय सेवेची अडीच वर्षे शिल्लक असताना केंद्रेकर यांनी निवृत्ती का घेतली याबद्दल चर्चा होत आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रात परिचित असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी…
-
भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोर जाळ्यात !
अंबाजोगाई- एक हजार रुपयांची लाच घेताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.आठवडाभरात एसीबी ची लाचखोराविरुद्ध ही तिसरी कारवाई आहे. तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फिस भरुन मोजनी करुन घेतली होती . सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथुन प्राप्त करण्यासाठी तक्रारदार…
-
जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !
बीड (प्रतिनिधी) – राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी…
-
भीषण अपघातात तिघे मित्र ठार !
बीड – बीड शहरापासून जवळच असलेल्या पेंडगावजवळ भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. चालकाचे नियत्रंण सुटून कार तीन ते चार वेळेस पलटी झाली अपघाताची ही घटना आज 23 जून रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोसापुरी शिवारात घडली अपघातातील मयत आणि जखमी नेवासा (जि.अहमदनगर) येथील रहिवासी असल्याचे…
-
परळीत राडा, एक ठार !
परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात…
-
आंतर जिल्हा बदलीवर बंदी ! जिथे नियुक्ती त्याच जिल्ह्यात निवृत्ती !!
बीड- यापुढे नव्याने शिक्षक भरती झाल्यास या शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीचा लाभ घेता येणार नाही.शासनाने काढलेल्या आदेशात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आंतर जिल्हा बदली हवी असल्यास आहे त्या ठिकाणच्या नोकरीचा राजीनामा देऊन नव्याने भरती प्रक्रिया पार करून हव्या त्या जिल्ह्यात नियुक्ती मिळवता येईल.शासनाच्या या आदेशामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार…