Category: बीड
-

जाटनांदूर जवळ अपघात ! चार जण जागीच ठार !
डोंगरकिन्ही– बीड कल्याण महामार्गावर डोंगर किनी नजीक असलेल्या जात नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे जात नांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगर कडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराई कडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला हा अपघात…
-

सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !
बीड- छत्रपती संभाजी नगर चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.केंद्रेकर यांनी शासनाकडे स्वेच्छा निवृत्ती चा केलेला अर्ज शासनाने मंजूर केला आहे.शासकीय सेवेची अडीच वर्षे शिल्लक असताना केंद्रेकर यांनी निवृत्ती का घेतली याबद्दल चर्चा होत आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रात परिचित असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी…
-

भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोर जाळ्यात !
अंबाजोगाई- एक हजार रुपयांची लाच घेताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.आठवडाभरात एसीबी ची लाचखोराविरुद्ध ही तिसरी कारवाई आहे. तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फिस भरुन मोजनी करुन घेतली होती . सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथुन प्राप्त करण्यासाठी तक्रारदार…
-

जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !
बीड (प्रतिनिधी) – राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी…
-

प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !
बीड- प्रेमविवाह होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ढोबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे…
-

भीषण अपघातात तिघे मित्र ठार !
बीड – बीड शहरापासून जवळच असलेल्या पेंडगावजवळ भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. चालकाचे नियत्रंण सुटून कार तीन ते चार वेळेस पलटी झाली अपघाताची ही घटना आज 23 जून रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोसापुरी शिवारात घडली अपघातातील मयत आणि जखमी नेवासा (जि.अहमदनगर) येथील रहिवासी असल्याचे…
-

परळीत राडा, एक ठार !
परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात…
-

आंतर जिल्हा बदलीवर बंदी ! जिथे नियुक्ती त्याच जिल्ह्यात निवृत्ती !!
बीड- यापुढे नव्याने शिक्षक भरती झाल्यास या शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीचा लाभ घेता येणार नाही.शासनाने काढलेल्या आदेशात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आंतर जिल्हा बदली हवी असल्यास आहे त्या ठिकाणच्या नोकरीचा राजीनामा देऊन नव्याने भरती प्रक्रिया पार करून हव्या त्या जिल्ह्यात नियुक्ती मिळवता येईल.शासनाच्या या आदेशामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार…
-

वाळू माफियांची तहसीलदारांवर दगडफेक ! एक जण जखमी !!
बीड-अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी दगडफेक केली. यामध्ये तहसीलदार यांच्या सोबत असलेला एक कर्मचारी जखमी झाला. पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीत गेल्या काही दिवसापासून रात्री व दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर नवीन रुजू झालेले तहसीलदार सारंग चव्हाण हे स्वतः बुधवारी…
-

रिपाईचा सरकारला ईशारा !
बीड- राज्यभर सरकारकडून सुरु असलेली गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने थांबवली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला.पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सरकारच्या धोरणावर टीका…



