Author: Author
-

पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !
बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…
-

दिड लाख विद्यार्थ्यांना मिळणार आयटीआय मध्ये प्रवेश !
बीड- दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआय मध्ये प्रवेश घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.राज्यभरात यावर्षी आयटीआय मध्ये वेगवेगळ्या ट्रेड च्या दीड लाख जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या आयटीआय मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन…
-

आजचे राशिभविष्य !
मेषः आज रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील.सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार-व्यवसायात तेजी राहिल.एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.…
-

मान्सून लांबल्यास पाणी संकट ओढवणार !
बीड- राज्यात यंदा मान्सून चे आगमन उशिरा होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.एकीकडे अंगाची लाही लाही करणारे प्रचंड ऊन अन दुसरीकडे लांबणारा पाऊसकाळ यामुळे जनता बेजार झाली आहे.अशात जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यातील धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 जुननंतर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील एकूण दोन हजार…
-

आजचे राशिभविष्य !
मेष-उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत.नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो. मात्र अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. पत्नी साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ…
-

जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचे निधन !
मुंबई-मराठी आणि हिंदी चित्रपटात आई,बहीण,प्रेयसी,मैत्रीण अशा विविध भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या आणि बॉलिवूड सह मराठी चित्रपट सृष्टीच्या दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलसा. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.…
-

मुलीला मंगळ असल्याची खात्री करण्याच्या आदेशाला स्थगिती !
नवी दिल्ली- अत्याचार पीडित मुलीला मंगळ असल्याने ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनी याबाबत माहिती घेऊन तपासणी करण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची देशभर चर्चा सुरू होती. बलात्कार प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं दिलेल्या एका निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यामध्ये पीडित मुलीच्या कुंडलीत मंगळ आहे की नाही हे तपासण्याचे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कामाच्या शोधात जे तरूण फिरत आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात सुख-शांती नांदेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे उच्च अधिकारी खूप खूश होतील. व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुम्ही तुमच्या…
-

ऑगस्ट मध्ये होणार तलाठी भरती !
बीड- महसूल विभागात येत्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मेगा भरती होणार आहे.चार हजार पेकशा जास्त तलाठी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. राज्यात 4625 जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे. भरतीची जाहिरात आल्यामुळे या भरतीची वाट…
-

पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!
परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप…



