News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcollector

  • आचारसंहिता सुरू असताना प्रमोशन साठी फिल्डिंग !

    बी एन्ड सी च्या मोमीन,शिंदेचा प्रताप ! बीड-बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक मधील शाखा अभियंता यांनी आपल्या प्रमोशनसाठी मुंबई वाऱ्या करत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देखील हे शाखा अभियंता मुंबईत जाऊन सेटिंग लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक…

  • बीडमध्ये मंगळवारी आदर्श शिंदेचा कार्यक्रम- आ क्षीरसागर !

    बीड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपास्थीत राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी…

  • महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार- पाटील !

    बीडमधून बजरंग सोनवणे यांनी भरला अर्ज ! बीड -देशात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचविण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाट आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथे बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. लोकसभेचे उमेदवार बजरंग …

  • संभाजीनगर मधून मंत्री भुमरे मैदानात !

    मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.येथे आता एमआयएम,उबाठा आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला…

  • शिवसंग्राम च्या मेटे यांची माघार !

    बीड-शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे स्पष्ट केलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ज्योती मेटे म्हणाल्या की, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना…

  • जम्मू,त्रिपुरा,आसाम,पश्चिम बंगाल मध्ये रेकॉर्डब्रेक मतदान !

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात देशातील 102 लोकसभा मतदारसंघात सरासरी 59 टक्के मतदान झाले.सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगाल मध्ये 77 टक्के इतके झाले आहे.आसाम,त्रिपुरा ,जम्मू काश्मीर या राज्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक…

  • बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !

    307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की  राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे  अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…

  • चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत मिळवले यश !

    बीड- शिरूर तालुक्यातील पाडळी येथे प्राथमिक शिक्षण घेत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत बीडीओ म्हणून नोकरी मिळवली,नोकरी करत करत यूपीएससी चा अभ्यास सुरू ठेवला,चारवेळा अपयश आले तरीही खचून न जाता पाचव्यांदा यश मिळवत आपलं लक्ष्य गाठणाऱ्या अभिजित पाखरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीडमधील चंपावती…

  • शरद पवारांच्या माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई मध्ये सभा !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 50 सभा होणार आहेत.बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या ठिकाणी सभा होणार आहेत.पवारांनी बारामती नंतर अहिल्यानगर (अहमदनगर)आणि बीडवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रभर मॅरेथॉन दौरा करणार असून २२ दिवसांमध्ये…

  • पुढील पंचवीस वर्षाचे आपले नियोजन – मोदी !

    नवी दिल्ली- पुढील पाच वर्षासाठी नव्हे तर माझ्याकडे 25 वर्षासाठीचे नियोजन आहे,2047 साली भारत हा विकसित राष्ट्र असेल त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ईडी,इलेक्ट्रोल बॉण्ड या सर्व आरोपांवर मोदी यांनी उत्तर दिले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी गेल्या दहा वर्षातील कार्यकाळ आणि पुढील 25 वर्षाचे…