Category: महाराष्ट्र
-

पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ!
बीड -राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी बीडच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बॉम्ब शोध पथक आणि पोलीस दल दाखल झाले. दुपारपर्यंत यामुळे पोस्ट ऑफिस बंद होते. स्वतःला ‘कोयंबटूरचे मुसलमान’ म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत.…
-

खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा!
मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासापूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण…
-

लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड!
परळी –वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेला परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला विभागीय आयुक्त यांनी सस्पेंड केले आहे. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिन्यात परळी येथील तहसीलदार मुंडे याने एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजाराची मागणी केली होती. तडजोडी नंतर वीस हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत…
-

हिवरापहाडी प्रकरणात बाल विवाहाचा गुन्हा दाखल!
बीड -तालुक्यातील हिवरापहाडी येथील प्रकरणात ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून सदर विवाहितेच्या आई वडिलांसह पाच जनावर गुन्हा दाखल झाला आहे. बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथील एका विवाहितेवर अत्याचार करून चावडीवरील एका खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. महिला आयोगाने या प्रकरणाची दाखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या विवाहितेचे चौदा…
-

अडीच हजार शिक्षकांनी भरली नाही माहिती!
बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमलेल्या एस आयटी कडे चार महिने उलटून गेले तरी अद्यापही तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त शिक्षकांची माहिती देण्यात आलेली नाही. सर्व शिक्षकांची माहिती अपलोड झाल्यानंतर कागदपत्रे तपासून बोगस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर तसेच संबंधित अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे अपलोड झालेल्या माहितीमध्ये तीस ते…
-

राज्यातील अडीच हजार शिक्षकांनी अद्याप भरली नाही माहिती!
बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमलेल्या एस आयटी कडे चार महिने उलटून गेले तरी अद्यापही तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त शिक्षकांची माहिती देण्यात आलेली नाही. सर्व शिक्षकांची माहिती अपलोड झाल्यानंतर कागदपत्रे तपासून बोगस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर तसेच संबंधित अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे अपलोड झालेल्या माहितीमध्ये तीस ते…
-

कृष्णा पानसंबळ वर कारवाई होणार!बांधकाम मंत्र्यांची घोषणा!
मुंबई – आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या जीवावर मनमानी कारभार करत बोगस बिले उचलून स्वतःचे घर भरणाऱ्या आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्या कारभाराची त्याच्या डिग्रीची आणि त्याने मंजूर केलेल्या कामांचे चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले…
-

देशात एस्मा कायदा लागू, जीवनावश्यक वस्तूची साठवणूक पडणार महागात!
नवी दिल्ली –इराण, अमेरिका आणि इस्त्रायल या देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात एस्मा कायदा लागू केला आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारे जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करणे गुन्हा ठरेल आणि कायदेशीर कारवाई होईल. गॅस पुरवठ्यात तुटवडा होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडरची साठवणूक रोखण्यासाठी आणि एलपीजी पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये…
-

अर्चना कुटेला ईडी कडून अटक!
मुंबई -ज्ञानराधा मल्टी स्टेट अपहार प्रकरणी अर्चना कुटे यांना सक्त वसुली संचालनाल्याने अटक केली आहे. 2467 कोटी रुपयांच्या अपहाराचा ठपका कुटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अर्चना कुटे यांना अटक केल्यानंतर मुंबई येथील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील तपासासाठी न्यायालयाने कुटे यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. इडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये…
-

दोन लाखापर्यंत कर्जमाफी!
मुंबई –राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील…



