Category: परळी
-

घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !
बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…
-

नऊ वर्षात मेडिकल पूर्ण करा नाहीतर घरी बसा !
नवी दिल्ली- मेडिकल चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नऊ वर्षात पदवीचे शिक्षण पूर्ण न केल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा परिक्षा देता येणार नाही.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केलेल्या नियमात हे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी पात्र होण्यासाठी त्यांना फक्त चार प्रयत्न मिळतील. नव्याने प्रसिद्ध झालेल्या पदवीधर वैद्यकीय…
-

दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !
बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…
-

पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !
बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…
-

पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!
परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप…
-

वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!
परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील. परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली…
-

पोलीस निरीक्षकाला अटक !
परळी- पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे. 2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर…
-

सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !
परळी- शहरातील बरकत नगर येथे एका घरात सिलेंडर चा स्फोट होऊन एकजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.घराला अचानक लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन…
-

वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!
परळी- भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 11 जून रोजी मतदान होईल तर 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा निकाल हाती येईल या कारखान्यावर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व…
-

जवाहर चे उद्या मतदान मात्र निकाल लागणार नाही !
परळी- माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मतदान शनिवारी सहा मे रोजी होणार आहे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे जवाहर वर ताबा कोणाचा मिळणार हे मात्र अनिश्चित काळासाठी कळणार नाहीये कारण या मतदानाची मतमोजणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केली जाणार असल्याने ती कधी…


