Author: Author
-

पती पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !
गेवराई- तालुक्यातील जातेगाव येथील बंडू चव्हाण आणि सोनाली चव्हाण या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण…
-

मराठा आरक्षण,मुख्यमंत्री शिंदेंची महत्वपूर्ण घोषणा !
मुंबई-मराठा आरक्षणाच्या विषयावर आयोजित सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर एकमत झालं. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सर्वांनी आग्रह धरला.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बैठकीत चर्चा झाली.मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय विनंती.थोडावेळ देण्याची विनंती. उपोषण मागे घेण्याचा ठराव करण्यात आला. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.…
-

गेवराई खून प्रकरणी आठ आरोपींना जन्मठेप !
बीड- ढोलकीच्या वादातून घडलेल्या हत्या प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एस पाटील यांनी ही शिक्षा ठोठावली. गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम माळी आणि धर्मराज माळी यांच्यात आराधी गीत म्हणण्यासाठी सामूहिक ढोलकी होती.ही ढोलकी नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी तुकाराम यांनी धर्मराजच्या घरून आणली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मराज…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही…
-

रिक्षा – कंटेनर च्याअपघातात तीन ठार !
धारूर – सासुरवाडी वरून रिक्षाने परत येत असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.बीड नजीक रिक्षाला कंटेनर ने जोराची धडक दिली.यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अजीम शेख राहणार इस्लामपुरा राजू चौक आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटेगाव तालुका धारूर येथे आपल्या सासरवाडीला गेले होते परत येत असताना…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील –…
-

चंद्राबाबू नायडू ना मुलासह अटक !
आंध्रप्रदेश- आंध्रप्रदेश चे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.कौशल्य विकास घोटाळ्यात नायडू यांच्यासह त्यांचे सहा सहकारी आणि मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल.…
-

बीड मतदारसंघातील वगळलेल्या मंडळांना मिळणार अग्रीम-आ क्षीरसागर !
बीड – अग्रीम पीक विमा मंजुरीतून वगळलेली बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत बीड व शिरूर तालुक्यातील महसूल मंडळांचा अग्रीम मंजूरीत नव्याने सामावेश करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांवर होणार्या अन्यायाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे आभार मानले आहेत. जिल्ह्यात पावसाच्या अभावाने खरीप हंगामातील शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले…



