News & View

ताज्या घडामोडी

शिंदे सरकार वाचलं !राज्यपाल,फडणवीस यांच्यावर ताशेरे !!

नवी दिल्ली- राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत घटना पीठाने 10 प्रश्न तयार करून सत्तासंघर्ष च प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवलं.त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवी तारीख मिळणार हे नक्की झालंय. सरकारवरील संकट यामुळे काही काळासाठी टळलं आहे हे नक्की.शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे हे नक्की.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी दुपारी बारा वाजता निकालाचे वाचन सुरू केले.यावेळी सुरवातीला त्यांनी नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख केला.हे प्रकरण वेगळं आहे,याचा संपूर्ण अभ्यास करावा लागेल अस न्यायालयाने म्हटलं आहे.

भारत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर !दरम्यान शिवसेना प्रतोद भारत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने शिंदे गटाला धक्का दिला आहे.अधिकृत व्हीप कोणाचा हे जाणून घ्यायचा प्रयत्न झाला नाही अस मत नोंदवले.अपत्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत अस म्हणता येणार नाही.दहाव्या सुचिमधील परिच्छेद 3 नुसार हे मत नोंदवणे योग्य नाही.त्यामुळे शिवसेना कोणाची हा दावा तकलादू आहे.

राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे……..! राज्यपालांनी सरकारच्या स्थिरतेबाबत अविश्वास प्रस्ताव आलेला नसताना बहुमत चाचणी घेणं हे बेकायदेशीर असल्याचं मत देखील न्यायालयाने नोंदवल आहे.पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणी योग्य नाही.न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ताशेरे ओढले.

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ………..! उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्स्थापित करू शकलो असतो अस म्हणत न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर आपलं मत दिलं आहे.

विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याची नोटीस त्यांच्या आमदारांना अपात्र करण्याच्या अधिकारांना मर्यादित करते का? याचा निर्णय घेणं मोठ्या खंडपीठाकडून व्हायला हवं.नबाम रेबिया प्रकरण लागू होईल की नाही यावर मोठ्या खंडपीठासमोर निर्णय व्हावा असं आम्हाला वाटतं.अजूनही काही उत्तरांची उकल होणे बाकी आहे.
व्हीप फक्त राजकीय पक्षच देऊ शकतो.

विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षावर त्यांच्या धोरणासाठी अवलंबून असू शकतात. पण विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षापासून वेगळा होऊन स्वतंत्र गट स्थापन करू शकतो, असा दावा करण्यात आला. पण घटनेमध्ये असं म्हटलेलं नाही. दहाव्या परिशिष्टाची सर्व रचना राजकीय पक्षावर अवलंबून आहे.
यामुळे अध्यक्षांनी नव्या गटाच्या प्रतोदाची नियुक्ती कोणत्या आधारे मान्य केली?, हे पाहावं लागेल.आमदार भरत गोगावले यांचा व्हीप घटनाबाह्य.

एकनाथ शिंदेंना पक्षनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे गटाकडून मंजूर करण्यात आला होता. अध्यक्षांना ३ जुलै रोजी पक्षातील फुटीबाबत माहिती होती. दोन प्रतोद आणि नेत्यांच्या नियुक्तीचा मुद्दा अध्यक्षांना फुटीबाबत माहिती होण्यासाठी पुरेसा होता.
पण अध्यक्षांनी त्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही. अध्यक्षांनी यासंदर्भात स्वतंत्र चौकशी करायला हवी होती. पण या प्रकरणात अध्यक्षांनी गोगावलेंना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देणं अवैध होतं.विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वत: ला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं, शिंदे गटाकडून भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नेमणूक बेकायदेशीर.मीच खरी शिवसेना’ असा दावा कुणीही करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *