बीड- विधानपरिषद आ सुरेश धस यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर हे अचानक रजेवर गेले आहेत.धस यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता जेजुरकर हे रजेवर गेल्याने या वादाला अधिक तोंड फुटले आहे.
पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करत आ सुरेश धस यांनी कृषी अधीक्षक यांची भेट घेतली होती.त्यावेळी धस आणि जेजुरकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती.
दरम्यान या वादानंतर जेजुरकर हे अचानक रजेवर निघून गेले आहेत.जेजुरकर यांच्या कार्यालयात येऊन काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देखील दिले आहे.
जेजुरकर यांचा कारभार यापूर्वी देखील वादग्रस्त झालेला आहे.त्यात आता आ धस यांच्यासोबत झालेल्या वादाने नेमकं काय होणार हे सांगणे अवघड आहे.
Leave a Reply Cancel reply