News & View

ताज्या घडामोडी

20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण – जरांगे पाटील यांचा सरकारला ईशारा !

बीड- सरकारने आरक्षण लवकर दिलं नाही तर 20 जानेवारी पासून मुंबईत मी स्वतः आमरण उपोषण करणार असा इशारा मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.बीड येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले.

बीड येथे आयोजित इशारा सभेपुर्वी जरांगे पाटील यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सभास्थळापर्यंत भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,नजर पुरत नाही तितक्या संख्येने जमलेल्या मराठा समाजाच्या महाप्रलयासमोर मी मनापासून नतमस्तक होतो.माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेल्याना मानाचा जय शिवराय.जिथं जागा मिळलं तिथं समाज बसलाय.मुंगीलाही मध्ये शिरता येणार नाही अशी विराट सभा आहे.

येवल्याचा येडपट म्हणत भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, शांत मराठा समाजाला डाग लावला.यांनी यांचे हॉटेल जाळले,आणि निष्पाप लोकांना अडकवले, भिणार तो मराठा नाही. निष्पपाना अडकवण्याचे षडयंत्र सरकारने केले.सरकार झोपू नका.

करोडो समाज एकत्र आला आहे,शांततेत आहोत आम्ही.हे कधीच कोणाच्या घरावर जाऊ शकत नाहीत.यांनीच यांचे घर जाळले.येवल्याच येडपट,बधिर झालंय. कशाला बोलतो रे मग,कशाला मराठ्यांच्या वाट्याला जातो.आता पिशव्या घेतल्यास नंतर तुटलेल्या चपला अन केळाचे सालपट घ्यावे लागतील.

आळी वळवळ करते आहे.गिरीश महाजन यांनी सांगितले बोलू नका मी समज देतो.डंगर झालेल्या म्हाताऱ्या ला कशाला बोलू.येडपट बुजगावणे.महाराष्ट्राला कलंक आहे हा.त्याच्यात किती दम आहे ते बघतो.

मी ओरिजिनल मराठा आहे.आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे,सरसकट आरक्षण द्या,सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी,त्याच ऐकू नका नाहीतर जड जाईल.मोठी जात संपवण्याचा घाट दिसतो आहे.तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. माझ्या मराठ्यांना तळपू नका,एकदा प्रयोग केलाय ,अंतरवलीच्या प्रयोगात अजून भोगताय. ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या.अन्याय केला तर येणार आंदोलन शंभर टक्के जड जाईल.

माझा समाज माझा मायबाप आहे,तुमच्या एकजुटीची ताकद वाया जाऊ देणार नाही.मी मॅनेज होत नाही ही त्यांची अडचण आहे. आरक्षण शंभर टक्के मिळणार. मला दुष्मन समजायला लागले.मी काय चूक केली.

सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.मराठ्यांच्या नादाला लागला की संपला.आपली मतं घेण्यासाठी दारात आला तर त्याला चपलेने बडवा. मराठा जात तुम्हाला संपवायची आहे.समाजाला डीवचू नका.

शांततेत आंदोलन करायचं.तुम्ही किती दिवस वेळ घेणार.आम्हाला मर्यादा आहे.20 जानेवारी पासून मुंबईत आमरण उपोषण करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *