News & View

ताज्या घडामोडी

राज्यातील कृषी विक्रेत्यांचा तीन दिवस बंद !

बीड- नवीन कृषी कायद्याला कृषी विक्रेत्यांनी विरोध दर्शविला असून येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी बंद चे आवाहन केले आहे.कृषी कायद्यातील जाचक तरतुरी रद्द करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे

महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्र ४०.४१,४२,४३ व ४४ मधील कृषी हिताल बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र ऐन रब्बी हंगामात येत्या गुरुवारी दि २ नोव्हेंबर ते शनिवारी ४ नोव्हेंबर असा ३ दिवसांचा बंद पाळून राज्य शासनाच्या या कायद्याचा निषेध नोंदवणार आहे

या संदर्भात महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोशिएशन (माफदा) यांनी वेळोवेळी कृषी सचिव ,कृषी आयुक्त ,तसेच कृषी मंत्री मा धनंजय मुंडे यांनाही निवेदन व मिटींग घेऊन सदर अन्यायकारक कायद्यातील जाचक नियमांमुळे होणारे संभाव्य नुकसान व धोके व संपूर्ण व्यापारावर होणारे विपरीत परिणाम व त्यातुनच एकंदरीत शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली गेली यावर समाधान कारक तोडगा न निघाल्यामुळे सदर ३ दिवसांच्या बंदचा निर्णय घेण्यात आला आहे आशी माहिती असोशियन चे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री तसेच राज्य अध्यक्ष विनोद तराळ पाटील राज्य सचिव विपिन कासलीवाल यांनी दिली या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र येत्या २ ,३ व ४ तारखे पर्यंत बंद राहतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *