News & View

ताज्या घडामोडी

बीड जिल्हा परिषदेला लागलेलं ग्रहण सुटलं !

बीड- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची बदली झाली आहे.अविनाश पाठक हे नवे सीईओ असतील.गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेला लागलेले ग्रहण यामुळे सुटलं आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सीईओ अजित पवार यांच्या कारभारावर अनेकांकडून टीका झाली होती.विशेषतः जल जीवन मिशन या योजनेत पवार यांनी मनमानी कारभार केला होता.एवढ्या मोठ्या योजनेचा बट्याबोळ त्यांनी केल्याने विभागीय चौकशी देखील झाली होती.

कोणत्याही विषयात हेयरिंग लावून विषय भिजत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध होते.त्या त्याविभागाच्या एच ओ डी ने फाईल आणल्यावर कोणतीही माहिती न घेता सही करणारा अधिकारी जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिलाच असेल.

निवृत्ती ला तीन महिन्यांचा कालावधी असल्याने त्यांची बदली अपेक्षित नव्हती.मात्र अधिवेशन संपले अन अविनाश पाठक यांची नियुक्ती झाल्याची ऑर्डर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *