Tag: #बीडन्यूज
-
परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!
परळी -केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक…
-
सरपंच पतीची हत्या, मसाजोग मध्ये तणाव!
केज -तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. या घटनेने मसाजोग मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊनअज्ञात व्यक्तीनी…
-
पहिल्याच भाषणात रोहित पाटलांनी सभागृह जिंकले!
मुंबई -अमृताहूनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत आपलं नाव देवा आहे त्यामुळे विरोधी पक्षाला सुद्धा गोड वागणूक द्याल अशी अपेक्षा करतो असा उल्लेख करणाऱ्या आ रोहित पाटील यांनी पहिल्याच भाषणात सभागृहाचे मन जिंकले. तासगाव कवठे महाकाळ मतदार संघातून विजयी झालेल्या रोहित पाटील यांनी आपल्या भाषणाने स्व आर आर आबांची आठवण करून दिली. राज्य विधानसभेचे…
-
डिसिएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन -एकनाथ शिंदे!
मुंबई -मी अडीच वर्षांपूर्वी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतला. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो आता डिसिएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे 21 वेळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी…
-
देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे, पवारांचा शपथविधी!
मुंबई -देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील 18 मुख्यमंत्री, मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्यासह संत महंत आणि हजारो लाडक्या बहिणींच्या साक्षीने राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले…
-
महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!
मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…
-
तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण…
-
फरार चंदूलाल बियाणीला अटक!
अंबाजोगाई -राजस्थानी मल्टीस्टेट पटसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदूलाल बियाणी याने आज अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पतकरली. बियाणी याने ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदूलाल बियाणी यांनी आज सोमवारी (दि.02) अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली. ज्ञानराधा मल्टीस्टेट…
-
निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!
बीड – माझ्या विरोधातील उमेदवाराने निवडणूक काळात पैशाचा बाजार मांडला, पण बीडच्या बहाद्दर जनतेने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. आता विरोधक पुढचे पाच वर्ष कसा निधी आणता अन कसा विकास करतात अशा धमक्या देत आहेत. पण जनतेच्या विकासासाठी वेळ पडली तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा बीडचे नवनिर्वाचित आ संदीप क्षीरसागर यांनी दिला.मायबाप जनतेने मला…
-
शिंदे यांचा मोठा निर्णय!
मुंबई -गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेची भरपूर सेवा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडका भाऊ झालो. ही पदवी मोठी आहे असं म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली….