Category: महत्त्वाच्या
-
बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!
नवी दिल्ली- देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान 13 मे रोजी होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात 19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात मतदान कधी आणि…
-
लोकसभा निवडणुकीची घोषणा !
4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…
-
शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !
मुंबई – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान…
-
प्रीतम ला विस्थापित होऊ देणार नाही- पंकजा मुंडे !
मुंबई- भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. “माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या…
-
ठाकरेंचे आ रविंद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश !
मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे आ रविंद्र वायकर यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.वायकर हे गेल्या काही दिवसापासून ईडी च्या रडारवर होते,त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक…
-
अशोक सराफ महाराष्ट्र भूषण !
मुंबई- नाटक,हिंदी, मराठी चित्रपट यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते,मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे….
-
दिलेला शब्द मी पाळला- मुख्यमंत्री शिंदे !
मुंबई- मी शब्द पाळणारा माणूस आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणारच अस सांगितले होते ते आज पूर्ण झाले.हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे,मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत अस सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्न निकाली निघाल्याची घोषणा केली. आजचा दिवस आनंदाचा,विजयाचा दिवस आहे,गुलाल उधळण्याचा दिवस आहे,मी तुमच्या प्रेमापोटी येथे…
-
अंधारेच्या काळात बीड शहर अस्वच्छते मध्ये टॉप टेन वर !
83 वरून 287 वर घसरले रँकिंग ! बीड- नगर परिषदेच्या प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर फक्त गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग करण्यात धन्यता मानणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यामुळे स्वच्छ भारत अभियानात 83 क्रमांकावर असणारे बीड शहर 287 क्रमांकावर फेकल्या गेले आहे.याचाच दुसरा अर्थ असा आहे की बीड अस्वच्छ ते मध्ये बीड शहर टॉप टेन मध्ये आले आहे….
-
अंधारे मॅडम तुम्हाला जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत का ?
बीड- राज्य सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात येत आहे.मात्र बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड तालुक्यातील अनेक शाळांमधून पाच सहा शिक्षक या कामासाठी नियुक्त केल्याने शाळा बंद राहण्याची वेळ आली आहे.मुख्याधिकारी अंधारे यांना शाळा बंद पाडायच्या आहेत…
-
गुत्तेदारांना पोसण्याचा अंधारे मॅडम चा उद्योग !
बीड- नगर पालिकेत छोट्या मोठ्या गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग सीओ नीता अंधारे यांनी सुरुकेला आहे.काही गुत्तेदाराच्या माध्यमातून आपल्या भावाला नव्या धंद्यात सेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे. बीड नगर पालिकेत रुजू झाल्यापासून नीता अंधारे यांनी प्रशासनाकडे कमी आणि गुत्तेदारांकडे जास्तीचे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.पाणी पुरवठा असो की स्वच्छता अथवा बांधकाम किंवा विद्युत विभाग…