News & View

ताज्या घडामोडी

Category: खेळं

  • भारताचा पाकवर मोठा विजय!

    भारताचा पाकवर मोठा विजय!

    दुबई -वर्ल्ड कप टी 20 च्या सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान ला धूळ चारली. 176 धावांचा पाठलाग करताना पाकची दमछाक झाली. शंभर धावा करताना पाकची दाणादण उडाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन च्या तुफानी फटकेबाजी मुळे पाकिस्तान समोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. एवढे मोठे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकची पहिल्या सहा षटकात चार…

  • अभिमानास्पद,भारत विश्व चॅम्पियन!

    अभिमानास्पद,भारत विश्व चॅम्पियन!

    पुणे -महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत विश्व चषकावर आपले नाव कोरले.भारतीय महिलांनी दाखवलेल्या जिगरबाज खेळीमुळे देशाची मान उंचावली आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होत असलेला फायनल सामना पावसामुळे २ तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ बाद २९८ धावा…

  • पाकडयांना धूळ चारली, भारत चॅम्पियन!

    पाकडयांना धूळ चारली, भारत चॅम्पियन!

    नवी दिल्ली – एशिया कपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला धूळ चारत भारतच चॅम्पियन असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेमध्ये भारताने तिसऱ्यांदा पाकचा पराभव केला आहे. अंतिम सामन्याचा हिरो ठरला तो अर्धशतक वीर तिलक वर्मा. एशिया कप ची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार असल्याने क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना…

  • भारतच चॅम्पियन!

    भारतच चॅम्पियन!

    दुबई -रोहित शर्मा ची तडाखेबंद खेळी आणि भारतीय गोलदाजांची अचूक गोलंदाजी यामुळे भारताने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताने हा सामना 4 विकेट राखून जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतकडून कर्णधार रोहित शर्माने चौकार – षटकारांची बरसात करत सुरुवात चांगली केली होती. त्याला दुसऱ्या बाजूने…

  • भारताचा विराट विजय!

    भारताचा विराट विजय!

    दुबई -आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तान चा सहा विकेटनी धुव्वा उडवला. विराट कोहलीच्या खेळीने भारताने 242धावांचे लक्ष्य सहज पार केले. 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार सुरवात केली. रोहित 31 धावावर बाद झाला.त्यानंतर विराट कोहलीनं डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं संयमाने फलंदाजी करत…

  • अविनाश साबळेला शिवछत्रपती पुरस्कार जाहिर!

    अविनाश साबळेला शिवछत्रपती पुरस्कार जाहिर!

    मुंबई -भारताचा प्रतीथयश खेळाडू बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रहिवाशी अविनाश साबळे याच्यासह अनेक खेळाडूंना राज्य सरकारने पुरस्कार घोषित केले आहेत. अविनाश ला मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाल्याने आष्टीत जल्लोष साजरा करण्यात आला.त्याने पॅरिसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला, परंतु पदकापासून तो दूर राहिला. २०२२-२३ चा जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना…

  • भारत विश्वविजेता!

    भारत विश्वविजेता!

    नवी दिल्ली -टी -20वर्ल्डकप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेते पद पटकावले. भारताने आफ्रिके समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आफ्रिका हे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी ठरला. भारताकडून विराट कोहली बे सर्वाधिक धावसंख्या उभारली.

  • बीडच्या सचिनने ठोकलं शतक !

    बीडच्या सचिनने ठोकलं शतक !

    नवी दिल्ली- अंडर 19 क्रिकेट वल्ड कप मध्ये बीडच्या सचिन धस याने पदार्पणातच शतक ठोकत नेपाळ विरुद्ध मोठी धावसंख्या उभारत भारताचा डाव सावरला . नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून…

  • बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली…

  • भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…