बीड – संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी अर्थिक विवंचनेला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यासाठी मंजूर २५ टक्के अग्रीम पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात सर्वत्र पावसाअभावी व अतिवृष्टीने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगोदर पावसाच्या अभावाने पिके करपली आणि नंतर अतिवृष्टीने पीकांचे नुकसान झाले आहे. या हंगामातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यात शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार पाठपुरावा केला. मोठ्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाकडून दोन टप्प्यांत जिल्ह्यातील ८६ मंडळांना २५ टक्के अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला.
- भाजपने हरियाणा राखले तर काश्मीर काँग्रेस कडे!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
परंतु अद्यापपर्यंत अग्रीम पीकविम्याची रक्कम वितरीत करण्याबाबत कार्यवाही सुरू न झाल्याने आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला असून अग्रीम पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Leave a Reply