News & View

ताज्या घडामोडी

ट्रकने मजुरांना चिरडले ! पाच जणांचा मृत्यू !!

बुलढाणा-राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर एक ट्रक काळ बनून आला.भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.

नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.. यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर काम करत असून महामार्गावर उड्डाणं पुलाचे काम सुरु आहे.. त्या कामावरील मजूर रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला टीनशेड मध्ये झोपले होते.. मात्र आज सकाळी 5:30 वाजे दरम्यान एक ट्रक भरधावं वेगाने आला आणि त्या टीनशेड वर घुसला .. या घटनेत त्या ट्रक खाली झोपलेले 10 मजूर चिरडले गेले.. त्यात चार मजूर जागीच ठार झाले .


या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णाल्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे…
अपघात झाल्यावर ट्रक चालक घटनास्थळ वरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे..
..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *