बीड -प्रतिनिधी
मुलाच्या शिक्षणासाठी गाव सोडून बीड गाठले…बीडमध्ये चालक म्हणून काम करत मुलाचे शिक्षण सुरु ठेवले.. आपल्या शिक्षणासाठी आईवडील घेत असलेल्या कष्टाची जाण मुलाने ठेवली अन् जेईई ॲडव्हान्स परिक्षेत यश मिळवले… राजवीर भारत कोकाट असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा आता आयआयटी प्रवेश निश्चित झालाय..
बीड येथील जोशीज मॅथस् क्लासेसमध्ये गेले दोन वर्ष धडे गिरवणाऱ्या राजवीर भारत कोकाट याने जेईई ॲडव्हान्स परिक्षा दिली होती. त्याचा नुकताच निकाल लागला यामध्ये त्याने जनरल पीडीब्लूडी मधून 93 तर ओबीसी पीडब्लूडी मधून 32 ही ऑल इंडिया रँक मिळवत आपला प्रवेश निश्चित केला. भारत कोकाट यांचे मुळ गाव गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव. गावी असलेली थोडीशी शेती व इतर काम यावरच ते कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. पण म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तशाच पद्धतीने राजवीरच्या हुशारीची झलक त्यांना पहायला मिळाली आणि त्याच्या शिक्षणासाठी भारत कोकाट यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. बीडसारख्या शहरात येवून कामही मिळवले आणि मुलाचे शिक्षण सुरु ठेवले. आई-वडील आपल्या शिक्षणासाठी कोणकोणत्या अडचणीतून मार्ग काढत आहेत हे राजवीरला दिसत होते. त्यानेही याची जाण ठेवत अभ्यास केला. जोडीला बीडमधील नामवंत असलेल्या जोशीज मॅथस् क्लासेसचे संचालक प्रा.सुनील जोशी यांचे मार्गदर्शन यामुळे त्याने जेईई ॲडव्हान्स परिक्षेत यश मिळवत आपला आयआयटी प्रवेश निश्चित केला. या यशाबद्दल नुकताच पालकांसह राजवीरचा सत्कार देखील करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.
मेहनतीला हवी योग्य मार्गदर्शनची जोड
स्पर्धेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांची मेहनतीची तयारी असते. रात्रंदिवस अभ्यास देखील करतात. परंतु अनेकदा यश हुलकावणी देते… असे होऊ नये याकरिता मेहनतीला मार्गदर्शनाची देखील जोड असावी लागते. अगदी असेच मार्गदर्शन बीडच्या जोशीज् मॅथस् मध्ये केले जाते. याबाबत प्रा.सुनील जोशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची कष्टाची तयारी असते परंतु अनेकदा नको त्या गोष्टीवर जास्त भर देत ते आपला वेळ वाया घालवतात. हे टाळण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देतो आणि त्यामुळेच क्लासेसचे विद्यार्थी कठीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिक्षांमध्येही चांगले यश मिळवतांना दिसतात.
Leave a Reply