पाचशे कोटीच्या घोटाळ्यात चौकशी सुरु असलेल्या अन बदली न करण्याचे आदेश असताना बदली झाल्याने आश्चर्य!
बीड -खाजगी शिक्षक भरती प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि शिक्षण मंत्रालयाने चौकशी सुरु केलेले आणि टी चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली ण करण्याचे आदेश दिलेले बीडचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची मंत्रालयातूनच अमरावती येथे बदली झाल्याने मंत्रालयातील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
बीड जिल्हा परिषद कायमच अनेक कारणांमुळे चर्चेत असते. यातच शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) यांनी जुन्या तारखेत (बँकडेट) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती दाखवून फरक देयक अदा करुन अनियिमतता आणि कोट्यवधीचा अपहार केल्याची तक्रार शासनाकडे दाखल झाली. यानंतर या तक्रारीबाबत शिक्षणाधिकारी फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी केलेल्या खुलाशात ‘गोलमाल’ असल्याचे शिक्षण सहसंचालकांच्या लक्षात आले मात्र या सर्वच प्रकरणात आता माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची बदली आदेश आल्याने यावर पडदा पडणार की काय? असा प्रश्न शिक्षणप्रेमी वर्गात निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक चौकशी करणार असून आता शिंदे यांची बदली झाल्याने हे प्रकरण मिटले जाणार की काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
शिक्षण अधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून खाजगी शिक्षण संस्था व अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करतांना सर्व नियम डावलून व संस्था चालक यांचेकडून आर्थिक देवाण घेवाण करुन वैयक्तिक मान्यता दिल्याचे, शिक्षण विभागाच्या इतर कामामध्येही पैसे घेतल्याशिवाय सही करीत नसल्याचे, संस्था चालकांकडून मागील तारखेमध्ये पद भरती दाखवून शिक्षकांचे मागील कालावधीतील थकीत वेतन मंजूर केल्याचे, ऑनलाईन पदभरती करणे आवश्यक असताना ऑफलाईन पदभरती केल्याचे विनाअनुदानित पदावरुन अनुदानित पदावर मागील तारखेमध्ये बदली करुन भ्रष्टाचार केल्याची तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत.

वरील आदेश हे 21 में 2025 रोजी शालेय शिक्षण विभागाने काढले होते. ज्यामध्ये चौकशी पूर्ण होईपर्यंत शिंदे आणि फुलारी या दोघांची बदली करू नये असे म्हटलं होते. असे असतानाही शिंदे यांचे नाच बदली च्या यादीत कसे आले अशी चर्चा सुरु झाली आहे. शिंदे यांनी मंत्रालयात फिल्डिंग लावली आणि बदली करून घेतली अशी चर्चा आहे.

एकीकडे शिक्षण विभाग 21 मे रोजी चौकशी लावून बदली ण करण्याचे आदेश काढतो अन तोच शिक्षण विभाग 30 में रोजी बदलीचे आदेश काढतो म्हणजे नेमकं मंत्रालयातील सावळा गोंधळ समोर आला आहे.
Leave a Reply