News & View

ताज्या घडामोडी

20250530 143702 scaled

अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी -शंकर देशमुख!

बीड -छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका अटकेपार फडकवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केले. अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त संस्कार भारती बीड आणि भारतीय जनता पक्ष बीड च्या वतीने अमृत मंगल कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या जीवनावर आधारित भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी अहिल्यादेवी यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. यवनांची सत्ता उलथून टाकण्यासाठी आणि हिंदू धर्म वाढवण्यासाठी तसेच टिकवण्यासाठी त्यांचे कार्य अनमोल होते. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचे काम आपण केलं पाहिजे. हे त्यांच्या जन्म त्रिशताब्दी चे वर्ष आहे, या वर्षभरात भाजपने अनेक कार्यक्रम केले. त्यांचे आदर्श अनेक पिढ्यासाठी प्रेरणादायी आहेत, असेही देशमुख यांनी म्हटले.

भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,जिल्हा सरचिटणीस प्रा देविदास नागरगोजे,कोषाध्यक्ष चंद्रकांत फड,माजी जी प अध्यक्ष मीराताई गांधले,नवनाथ शिराळे, शांतीनाथ डोरले,सलीम जहांगीर, अजय सवाई, संस्कार भारतीचे प्रांतमंत्री प्रमोद वझे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सौन्दतिकर, जगदीश पिंगळे, वासुदेव निलंगेकर, स्नेहाताई पारगावकर यांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत छोट्या गटात आदित्य चव्हाण (प्रथम ), श्रावणी डोंगरे (द्वितीय ),प्रगती शिंदे (तृतीय )तर उत्तेजनार्थ कौमुदी रुईकर आणि प्रतिज्ञा क्षीरसागर यांनी तर मोठ्या गटात दीप्ती महाजन (प्रथम ),नंदिनी गर्गे (द्वितीय ),धुरंधरे वैभवी (तृतीय ) आणि पवार शिवांजली,गायत्री सुपेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष पारगावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *