News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250418 WA0008

ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!

बीड -आयुष्यात ज्या व्यक्तीला आई कळली त्याला धर्म कळला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ च्या संस्कारावर वाटचाल करत स्वराज्याची स्थापना केली असे उदगार हभप कबीर महाराज यांनी काढले.

स्वर्गीय सुरेखाताई रवींद्र क्षीरसागर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित पंचदिनात्मक भव्य कीर्तन महोत्सवात हभप कबीर महाराज आतार यांची द्वितीय दिवसाची सेवा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते

करणे पाखंडखंडण ।।

हेचि आम्हा करणे काम।

बीज वाढवावे नाम।।

तीक्ष्ण उतारे ।

हाती घेऊनि बाण फिरे।।

नाही भीड भार ।

तुका म्हणे सान थोर

या अभंगाचे त्यांनी निरूपण केले.
भक्ती मार्गाने परमार्थ करणे हे काम संत जगतगुरु तुकोबारायांनी केले तर हाती शस्र घेऊन धर्मरक्षणाचे काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले जिजाऊ चे संस्कार शिवाजी महाराजांना मिळाले त्यांनी हिंदवी स्वराज्य घडवले मात्तृत्वाचे महत्व हे महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि धर्मातील महत्वाचे तत्व आहे राजकारण करत असताना क्षीरसागर कुटूंबाने धर्मकारण कधीही दूर केले नाही म्हणुन आज तळागाळातील लोक या कुटुंबाशी जोडून आहेत या कुटुंबाला स्वर्गीय केशरकाकू पासून मातृत्वाची परंपरा आहे . स्वर्गीय सुरेखाताई क्षीरसागर यांनी राम नामच जप आयुष्यभर केला त्या राम नामाच्या जपाचा वारसा हेमंत क्षीरसागर पुढे चालवत आहेत हेच तत्व या कुटुंबाला नेतृत्वाचे ,समाज समाजकारणाचे मूळ आहे.
त्यांनी असाच समाज सेवेचा वसा पुढे चालवावा राजकारण हे सुंदर समाजकारण आहे आणि ते आपण जपले पाहीजे.


हे काम आमचे हेमंत भैय्या क्षिरसागर करत आहेत. यावेळी रविंद्र क्षीरसागर हेेमंंत क्षीरसागर मकरंद शास्त्री आदींसह पंचक्रोशीतील भाविक,नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *